```html
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ : महत्त्वाचे मुद्दे
१. प्रस्तावना :
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्प सादर केला.
- संकल्पना : 'विकसित भारत'.
२. अर्थसंकल्पीय अंदाज (२०२६-२७) :
- एकूण खर्च : ५३.५ लाख कोटी रुपये.
- राजकोषीय तूट : GDP च्या ४.३%.
- केंद्राची निव्वळ कर प्राप्ती : २८.७ लाख कोटी रुपये.
३. महत्त्वाच्या योजना :
- बायोफार्मा शक्ती योजना : १०,००० कोटी रुपये तरतूद.
- इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.० चा प्रारंभ.
- कंटेनर उत्पादन योजना : ५ वर्षांत १०,००० कोटींची गुंतवणूक.
- एमएसएमई ग्रोथ फंड : १०,००० कोटी रुपये.
४. पायाभूत सुविधा :
- डंकुनी ते सुरत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर.
- २० नवीन राष्ट्रीय जलमार्गांचे नियोजन.
- वाराणसी आणि पाटणा येथे जहाज दुरुस्ती केंद्रे.
५. ऊर्जा आणि पर्यावरण :
- कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानासाठी ५ वर्षांत २०,००० कोटींची तरतूद.
- सी-प्लेन कनेक्टिव्हिटी योजना.
```